TOD Marathi

मुंबई : ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि ज्यांच्या अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील, अशा पक्षाला टीका करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. पहिल्यांदा त्यांनी आरसा पहावा आणि मग ट्वीट करावं, असं देखील ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ( Deputy CM Devendra Fadanvis )

राज्याच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही या आक्षेपावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले, तुमचा आक्षेप लवकरच दूर होईल. महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात दिले जाईल. त्यांनी पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री होते. त्यात देखील महिलांचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. ( Maharashtra Cabinet Expansion )

मंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीस म्हणाले, काही लोक बोलत होते, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. विस्तार झाला तर सरकार पडेल. मात्र विस्तारही झाला, सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थित झाले नाही.

संजय राठोड ( Sanjay Rathod ) यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यापेक्षा अधिक सांगण्याची आवश्यकता नसल्याचेही फडणवीस म्हणाले.